-
रामजन्मभूमी
-
भारतीय गणिती
-
भारतीय वैज्ञानिक
-
प्रयोगातून विज्ञानाकडे
-
यशस्वी नेतृत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व
-
आपत्ती व्यवस्थापन
-
गौरवशाली भारतीय कालगणना
-
चाणक्य सूत्रे
-
यशस्वी व्यवस्थापनासाठी समर्थ सूत्रे
-
विदुरनीति
-
शुक्रनीती
-
अंगलक्षण
-
शकून संकेत
-
स्वप्न संकेत
-
शाखा व्यवस्थापन
Posted in Uncategorized | Leave a Comment »
Posted in Uncategorized | Leave a Comment »
Posted in Uncategorized | Leave a Comment »
भाग्यशाली ग्रंथ संग्राहक योजना
प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रात कुठेही कोणत्याही विक्रेत्याकडून नचिकेत प्रकाशनाचे पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही भाग्यशाली विजेता सोडत योजना आहे.
स्वरूप :
ग्रंथ संग्राहकांनी आमचे कोणतेही पुस्तक कुठल्या दुकानातून किती तारखेला खरेदी केले हे कॅश मेमो क्रमांकसह आम्हाला ईमेल/एसएमएस/पत्राने कळवा. दर महिन्याला त्यातून एक भाग्यशाली विजेता निवडला जाईल आणि त्याला नचिकेत प्रकाशनाचे एक पुस्तक आमच्या खर्चाने घरपोच पाठविले जाईल. तसेच त्याचे नाव, पत्ता व छायाचित्र इंटरनेटवर नचिकेत प्रकाशनाच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले जाईल. दर महिन्यात ही सोडत होईल. 1 ऑगस्ट पासून योजना सुरू होईल व 15 सप्टेंबरला निकाल नेटवर जाहीर केला जाईल. पुढील महिन्याच्या 10 ते 15 तारखेदरम्यान सोडत निकाल जाहीर केला जाईल. त्या महिन्यात सर्वाधिक खरेदी ज्या ग्रंथ विक्रेत्याकडून झाली असेल त्याचेही नाव, पत्ता व छायाचित्र या महिन्याचा सर्वाधिक यशस्वी ग्रंथविक्रेता म्हणून नेटवर टाकले जाईल. आपण सर्वांनी या योजनेत अवश्य सहभागी व्हावे.
Posted in Booksellers, Customers, Pramotion | Leave a Comment »
तुम्ही कुठेही असा, नचिकेत प्रकाशने दूर नाहीत
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. कृपया आपल्या मौल्यवान, मार्गदर्शक सूचना येथे अवश्य नोंदवा.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
granthasampada.worldpress.com वर आपल्या पुस्तकांचा परिचय मुखपृष्ठासह इंटरनेटवर प्रसिद्ध
करा आणि हजारो लोकापर्यंत आपल्या पुस्तकांची माहिती घरबसल्या पोहचवा.
* पुस्तक परिचय 300-400 शब्दांपर्यंत आणि मुखपृष्ठ पाठवा.
* सॉफ्ट कॉपी पाठविल्यास 300/-रू. प्रति पुस्तक
* हार्ड कॉपी पाठविल्यास 500/-रू. प्रति पुस्तक
* अधिक माहितीसाठी लगेच फोन करा-9225210130 किंवा इमेल करा anilsambare@gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
रामजन्मभूमीसाठी संघाचे नेतृत्व हवे : डॉ. वि.स. जोग
भारतीय विचार मंच आणि नचिकेत प्रकाशनातर्फे प्रभावी परिचर्चा
नागपूर 16
कम्युनिस्टांनी रामजन्मभूमी प्रकरणाकडे वास्तववादी दृष्टिकोणातून बघितले पाहिजे. कम्युनिस्ट व मुसलमान बदलत आहेत. मुसलमान मुल्ला-मौलवींच्या तावडीतून सुटत आहेत. हिंदूंनी देखील संतमहंतांच्या मतापेक्षा रा.स्व. संघाच्या बुद्धिवादी नेतृत्वाचा स्वीकार करावा, असे आवाहन प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत डॉ. वि.स. जोग यांनी केले. भारतीय विचार मंच व नचिकेत प्रकाशनातर्फे आयोजित श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनावरील परिचर्चेत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. बनवारीलाल पुरोहित होते.
डांगे नंतर कम्युनिस्ट भारतीय परंपरा विसरले आहेत, असा आरोप करीत जोग म्हणाले की, कम्युनिस्ट मुसलमानांसमोर वाजवत असलेली हिंदुद्वेषाची तीच ती रेकॉर्ड ऐकून मुसलमान कंटाळले आहेत. ते राष्ट्रवादाकडे वळत आहेत. यावरून कम्युनिस्टांनी धडा घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले.
रामजन्मभूमीबाबतचा जनतेच्या न्यायालयाचा निर्णय 6 डिसेंबर रोजीच लागला आहे. आता 24 तारखेला येणारा निकाल हा त्या जागेच्या मालकी हक्काबाबतचा आहे, असे स्पष्ट करीत जोग म्हणाले की, “संघपरिवार देखील संघर्षाच्या भूमिकेवरून कायदेशीर प्रक्रियेवर आला आहे आणि हा बदल कालोचित आहे. या प्रकरणी धमकी किंवा अनुनय कामाचा नाही. प्रबोधनाचाच मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. असे झाले तर मुसलमान व हिंदू यांच्या एकत्रित कारसेवेने अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.’
डॉ. चंद्रशेखर फडनाईक
इतिहासाचे प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर फडनाईक यांनी भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा मागोवा घेतला. मुसलमानी राज्य भारतात स्थिरपद झाल्यावर त्यांनी हिंदूंना नि:शस्त्र केले. हिंदूंचे आत्मतेज कायम राहावे म्हणून या काळात भक्तिसंप्रदाय उदयाला आला आणि त्याद्वारे राम व कृष्ण यांचे दैवतीकरण करण्यात आले, असे सांगून ते म्हणाले की, मोगलात दिल्लीची सत्ता प्राप्त झाल्यावर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिर पाडण्यात आले. पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला नसता तर त्याचवेळी अयोध्येचा प्रश्न सुटला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. हरभजनसिंग हंसपाल
हिंदीचे प्राध्यापक डॉ. हरभजनसिंग हंसपाल यांनी शीख व अयोध्या यांच्या संबंधावर प्रकाश टाकला. गुरू गोविंदसिंगांनी एकदा अयोध्या मुसलमानांच्या तावडीतून मुक्त केली होती, असे सांगून ते म्हणाले की, गुरू गोविंदसिंग यांच्या रामावतार नावाच्या पुस्तकात रामाच्या 13 युद्धांचे वर्णन आहे. गुरू ग्रंथसाहेबमध्ये रामाचे नाव 1475 वेळा तर हरी हे नाव 2400 वेळा आले आहे.
शीख व राम यांच्यात फार प्राचीन संबंध असल्याचे प्रतिपादन करीत ते म्हणाले की, या दोन समुदायात भांडण लावणारे राजकारणी लोक आहेत आणि म्हणून लोकांनी त्यापासून दूर राहावे.
ऍड. पद्मा चांदेकर
ऍड. पद्मा चांदेकर यांनी, 1950 साली न्यायालयाच्या एका अंतरिम आदेशाने तिथे अखंड पूजाअर्चा व रामायणपाठ होत आहे व हा अंतरिम आदेशच अंतिम आदेश म्हणून जाहीर होईल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
प्रा. कुमार शास्त्री
प्रा. कुमार शास्त्री म्हणाले की, एवढी वर्षे साक्षीपुराव्यात घालविल्यानंतर, निकाल तयार झालेला असताना न्यायालय समझोत्याची भाषा करीत आहे, हे अनाकलनीय आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल जाहीर करावा. ऐतिहासिक सत्याची जाहीर चर्चा झाली पाहिजे, असे सांगतानाच, 24 सप्टेंबरचा निकाल पुन्हा एकदा जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड या धर्तीवर जाण्याची शक्यता आहे, अशी त्यांनी भीती व्यक्त केली.
बनवारीलाल पुरोहित
माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी मंदिर भव्य बनेपर्यंत मागे हटणार नाही. अशी कणखर भूमिका मांडली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या कायदेशीर चौकटीत प्रतिक्रिया व्यक्त करू या भूमिकेबाबत पुरोहित म्हणाले, अधर्मींशी लढण्यासाठी धर्माचे पालन केलेच पाहिजे असे नाही. अधर्मी नष्ट होणे महत्वाचे आहे. यासाठी त्यांनी कृष्णाने कर्णाला कसे ठार करविले, याचे उदाहरण दिले.
आशुतोष अडोणी यांनी सूत्रसंचालन तर नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ विचारवंत पत्रकार दि. भा. घुमरे देखील उपस्थित होते. श्री. आनंद किटकरू यांनी प्रारंभी वैयक्तिक गीत गायले. सामूहिक एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
“जागतिक महिला वैज्ञानिक” पुस्तकांचे
लोकांच्या शाळेत विद्यार्थिनींसमोर अभिनव प्रकाशन
छायाचित्रात पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडुन प्रा. ढोक सर, प्रकाशक अनिल सांबरे, लेखक प्रा. प्रकाश माणिकपुरे, लोकशाही वार्ताचे संपादक श्री. ल. त्र्यं. जोशी आणि श्री. पुसदकर सर दिसत आहे.
नागपूर ता. 5
भारतापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेतून जास्तीत जास्त महिला विज्ञानातील संशोधनाकडे वळत आहेत. शंभर कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र तशी स्थिती नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. त्यामुळे भारतात विज्ञानातील संशोधनासाठी पोषक असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी आज केले.
लोकांची शाळा तसेच नचिकेत प्रकाशन यांच्या संयुक्त वतीने आज प्रा. माणिकपुरे लिखित “जागतिक महिला वैज्ञानिक” आणि नचिकेत प्रकाशना तर्फे प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन दि. 5 ऑक्टोबरला शाळेच्या प्रांगणात झाले. यावेळी “लोकशाही वार्ता” चे मुख्य संपादक श्री. ल. त्र्यं. जोशी अध्यक्षस्थानी होते. शाळेच्या प्राचार्या आर. आर. राठोड, उपमुख्याध्यापक एस. एन. पुसदकर, संस्थेचे सचिव एम.एम. ढोक, नचिकेत प्रकाशनचे श्री. अनिल सांबरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी विज्ञान मंडळाचे उद्घाटन देखील पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. माणिकपुरे पुढे म्हणाले, “भारतातील विद्यार्थी अभियांत्रिकी तसेच इतर तांत्रिक शिक्षणाकडे विशेषत्वाने वळत आहेत. पण विज्ञानाच्या मूळ सिद्धांताकडे त्यामुळे दुर्लक्ष होत आहे. परिणामी आपल्या देशात विज्ञानातील संशोधनाकडे कल असणारे कमी विद्यार्थी आहेत.”
खऱ्या अर्थाने विज्ञानाची सुरूवात 400 वर्षांपूर्वी झाली. गॅलिलीओने चारशे वर्षापूर्वी टेलिस्कोपचा शोध लावला होता. म्हणूनच जगभर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ खगोलशास्त्रावर कार्यक्रम घेण्यात आले. 1946 मध्ये गॅलिलीओला तुरुंगात डांबण्यात आले. तेथून बाहेर पडल्यावर त्याचे निधन झाले आणि त्याच दिवशी न्युटनचा जन्म झाला, अशी माहितीही त्यांनी दिली. प्रा. माणिकपुरे यांच्या पुस्तकात जगभरातील महिला वैज्ञानिकांची जीवनकार्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष श्री. ल.त्र्यं. जोशी यांनी प्रा. माणिकपुरे यांच्याकडून येत्या काळात भारतीय महिला वैज्ञानिकांवर एक पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. टेस्ट ट्यूब बेबीचे जनक ब्रिटनचे रॉबर्ट एडवर्ड यांना कालच नोबेल पुरस्कार जाहीर झाला आणि रशियन वैज्ञानिक आंद्रे गिम यांना पदार्थ विज्ञानाचा नोबेल जाहीर झाला, हा एक योगायोग आहे, असेही ते म्हणाले. नचिकेत प्रकाशन जाणीवपूर्वक विज्ञानाची व माहितीपर उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करीत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले. आज सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हीच विज्ञानातील प्रगती आहे, असे सांगून प्रा. माणिकपुरे जेव्हा भारतीय महिला वैज्ञानिकांवर पुस्तक लिहतील तेव्हा तुमच्या पैकी पंधरा मुलींचा त्यामध्ये समावेश व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमांचे संचालन विद्यार्थिनीनींच केले, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होय.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
प्रत्येक जण इको सिस्टिम चा अंग, हे विसरल्यानेच पर्यावरण ऱ्हास
प्रदूषणापासून पर्यावरणाकडे प्रकाशनात डॉ. सतीश वटे यांचे मार्गदर्शन
पुस्तक प्रकाशन प्रसंगी छायाचित्रात डावीकडून श्री. श्याम पांढरीपांडे, प्रा. राम गावंडे, श्री. गिरीश गांधी, डॊ. सतीश वटे आणि श्री. अनिल सांबरे दिसत आहे.
नागपूर, ता.
माणूस स्वत:ला इको सिस्टिमचा एक भाग समजत नाही, त्यामुळे तो तिला स्वत:च्या स्वार्थासाठी वेठीस धरतो आणि त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदुषणाचा विळखा वाढतो. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने हे समजले पाहिजे की, तो या इकोसिस्टिम चा अभिन्न भाग आहे आणि इकोसिस्टिमचे नुकसान म्हणजे त्याचे स्वत:चे नुकसान होय, असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी केले.
नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या प्रदूषणातून पर्यावरणाकडे या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. नाशिक चे प्राचार्य डॉ. किशोर पवार आणि सौ. नलिनी पवार यांनी हे अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. वनराई आणि नचिकेत प्रकाशन यांनी संयुक्त रीत्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सर्व प्रकारच्या प्रदूषणांची अत्यंत माहितीपूर्ण ओळख सोप्या भाषेत करण्याचे महत्वपूर्ण काम या पुस्तकाद्वारे झाले आहे, असे डॉ. वटे म्हणाले. कोणत्याही ठिकाणी प्रदूषणाचा ऱ्हास होताना दिसल्यास प्रत्येक नागरिकाने शिक्षकाचे रूप धारण करून उपदेश देण्याचे कार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.
यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून निसर्गाची हानी होताना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “या पुस्तकामध्ये निसर्गाच्या सर्व अंगांचा विचार करून पर्यावरणासंबंधी अधिकाअधिक माहिती दिली आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. निसर्गाच्या सामंजस्याची जाणीव ठेवून त्यांच्या सामावून घेण्याच्या, शुद्ध करून घेण्याच्या क्षमतेची मर्यादा आपण ओलांडणार नाही, याची काळजी केली पाहिजे.”
पर्यावरणक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी पर्यावरण धोक्यांची माहिती लोकांपर्यंत विविध मार्गांनी पोहचवून त्यांचे प्रबोधन केले पाहिजे आणि पर्यावरण रक्षणातील त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे, असे मार्गदर्शन वनराईचे विश्र्वस्त आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गिरीश गांधी यांनी केले.
प्रा. राम गावंडे यांनी प्रास्ताविकातून अशा पुस्तकांच्या प्रकाशनांची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाची सुरवात ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते श्री. प्रद्युम्न सहस्त्रबुद्धे यांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने झाली. डॉ. सतीश वटे यांचे स्वागत श्री. नितीन जतकर यांनी केले. श्री. गिरीश गांधी यांचे स्वागत श्री. अनिल सांबरे यांनी केले. तर श्री अनिल सांबरे यांचे स्वागत पर्यावरण कार्यकर्ते श्री स्वानंद सोनी यांनी केले.
नचिकेत प्रकाशनाचे संचालक श्री. अनिल सांबरे यांनी अशा पुस्तकाच्या प्रकाशनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. नचिकेत प्रकाशनाचे पर्यावरणासंबंधी हे पाचवे पुस्तक आहे, असे ते म्हणाले. श्री. नितीन जतकर यांनी आभार मानले. सौ. अमृता सोनी यांच्या सुरेल पसायदान गायनाने या सुनियोजित कार्यक्रमाची सांगता झाली. पर्यावरण क्षेत्रातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार श्री. श्याम पांढरीपांडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम अर्थपूर्ण संचालन केले.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
Posted in Uncategorized | Leave a Comment »
Posted in Uncategorized | Leave a Comment »
नचिकेत प्रकाशनाने आता निवडक ललित पुस्तके प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार काव्यप्रभा या पहिल्या काव्यसंग्रह प्रकाशनानंतर व्यक्त मी अव्यक्त मी हा प्रा. सुनील जोशी यांचा काव्यसंग्रह नुकताच 9 एप्रिलला, नागपूर येथे सुप्रसिद्ध कवी डॉ. श्रीधर शनवारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. सोबत त्याचे वृत्त व छायाचित्र आपल्या माहितीसाठी पाठवित आहोत.
प्रत्येक कवी – साहित्यिकाला प्रतिभेचे वरदान असावेच लागते
-डॉ. श्रीधर शनवारे
प्रा. सुनील जोशी यांचा “व्यक्त मी अव्यक्त मी” काव्य संग्रह नचिकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित
नागपूर ता.
नचिकेत प्रकाशनाने प्रकाशन केलेल्या ङ्कव्यक्त मी अव्यक्त मीङ्ख या प्रा. सुनील जोशी यांच्या पहिल्या काव्य संग्रहाचे प्रकाशन दि. 9 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध कवी डॉ. श्रीधर शनवारे यांच्या हस्ते झाले. प्रत्येक कवीला कमी जास्त प्रमाणात का होईना पण प्रतिभेचे वरदान असतेच कारण त्याशिवाय त्याला कविता स्फुरू शकत नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर शनवारे यांनी या प्रसंगी केले. प्रा. सुनील जोशी यांना हे प्रतिभेचे वरदान किती टक्के मिळाले आहे, ते रसिक पुढील काळात सांगतीलच, असेही ते पुढे म्हणाले.
वेगवेगळ्या कवींचे दाखले देत या काव्यसंग्रहातील कोणत्या कविता आपल्या विशेष कां वाटल्या व भावल्या, याचे अत्यत उत्तम रसग्रहण सुप्रसिद्ध वक्ते आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. प्रकाश एदलाबादकर यांनी आपल्या रंजक पण माहितीपूर्ण भाषणात केले. एक काव्यरसिक या नात्याने आपण हे रसग्रहण करीत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कवी प्रा. सुनील जोशी यांना त्यांच्या काव्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वत: मधील अस्वस्थतेचा शोध घेताना आपण केव्हा कविता करू लागतो, ते मला कळलेही नाही, असे प्रा. सुनील जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
पुणे, मुंबई बाहेरील साहित्यिकांना महाराष्ट्रभर पोहचविण्याचे उद्दिष्ट ठरवून नचिकेत प्रकाशन आज काही मोजकी ललित प्रकाशनेही करीत आहे, असे प्रास्तविकात नचिकेत प्रकाशनाचे श्री. अनिल सांबरे यांनी सांगितले. वेगळे विषय, दर्जेदार निर्मिती आणि प्रभावी वितरण व्यवस्था म्हणजे नचिकेत प्रकाशन, असे समीकरण तयार झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रारंभी अतिथींच्या हस्ते देवी सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. नंतर श्री. अनिल सांबरे यांच्या हस्ते दोन्ही अतिथी आणि कवींचे वडील श्री. विनायकराव जोशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. श्रीधर शनवारे यांच्या हस्ते प्रा. सुनील जोशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकानंतर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सुप्रसिद्ध निवेदक श्री. किशोर गलांडे यांनी या कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी संचालन केले. तसेच त्यांच्या सुरेल पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विनोबा विचार मंच सभागृह रसिकांनी भरगच्च भरला होता.
या काव्यसंग्रहात कविता सात गटात विभागल्या असून प्रत्येक गटाच्या प्रारंभी कविने आपली त्या कवितांमागील भूमिका मांडली आहे, हे या काव्यसंग्रहाचे वेगळेपण ठरावे. काव्यसंग्रहाच्या नावाशी अत्यंत सुसंगत असे मुखपृष्ठ आणि उत्तम मांडणी यांनी या काव्यसंग्रहाच्या मूल्यात निश्चितच भर टाकली आहे. संपूर्ण काव्य संग्रह श्री. हेमंत मानमोडे यांच्या गूढ पण अर्थपूर्ण रेखाचित्रांनी अधिकच देखणा झाला आहे. सुप्रसिद्ध कवी श्री. शंकर बढे यांची प्रस्तावना या काव्य संग्रहाला लाभली आहे.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
लहान थोरांचे वैज्ञानिक मनोरंजन करणारे
यंत्रांमागील विज्ञान
नचिकेत प्रकाशन नागपूरने प्रकाशित केलेले लेखक जयंत एरंडे लिखित यंत्रांमागील विज्ञान हे पुस्तक वाचनात आले.
रोजच्या वापरातल्या वस्तू आपण वापरत असतो. परंतु या वस्तूंची आपल्याला साधी माहितीही नसते. स्वयंपाक घरातील फ्रीज कसे काम करतो. तो कोणी बनविला आदी बाबींची रंजक माहिती जयंत एरंडे यांनी या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंबाबतची वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, अशी लेखकाची अपेक्षा दिसून येते.
लेखक जयंत श्रीधर एरंडे यांचा परिचय या पुस्तकात थोडक्यात देण्यात आला आहे. त्यावर नजर टाकल्यास एरंडे यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान लक्षात येते. तसेच त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील माहितीचा सकसपणा दिसून येतो.
या पुस्तकातून त्यांनी वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, रेडीओ, टोस्टर, फॅक्स, झेरॉक्स, हीटर, व्हॅक्युम क्लिनर, टीव्ही, कॉम्प्युटर, पेजर, रिमोट कंट्रोल, टेलिफोन, रडार, विमान, मोबाईल फोन, बॅटरी, चष्मा आदी गोष्टींचा वैज्ञानिक परिचय अत्यंत सोप्या भाषेत करून दिला आहे.
याचबरोबर आकाश निळे का दिसते? ढग काळे कां दिसतात? साखर कशी तयार होते? आग कशी विझवतात? यांची उत्तरे दिली आहेत. उपयुक्त वायूंची दुनिया कशी आहे? पेन्सिल कशी तयार होते? कागद कसा तयार होतो? संगीतातील ध्वनी कसा निर्माण होतो? आदी प्रश्नांची उकलही ते मनोरंजक पद्धतीने व थोडक्यात करून देतात.
थोडक्यात वाचकाला आपल्या भोवती असलेल्या वस्तूंचा वैज्ञानिक दृष्ट्या परिचय करून देण्याचा तसेच वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखक जयंत एरंडे करून देतात. त्यांचा हा छोटासा प्रयत्न फारच उपयुक्त आहे. नचिकेत प्रकाशन, नागपूरने हे पुस्तक प्रकाशित करून लहान मुलांबरोबरच मोठ्यांचेही वैज्ञानिक मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे.
यंत्रांमागील विज्ञान : ले. जयंत एरंडे
पृष्ठ संख्या : 128, किंमत : 125 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
Posted in Uncategorized | Comments Off
महर्षी भृगू, मृत्यूंजय मार्कंडेय आणि भावना ऋषी या तीन महापुरुषांची चरित्रे
नचिकेत प्रकाशनातर्फे प्रसिद्ध

कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाला लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात बहुसंख्येने वसलेल्या व प्रामुख्याने विणकर व्यवसायात असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य असलेले महर्षी भृगु आणि त्याच कुलपरंपरेतील मार्कंडेय ऋषी आणि भावना ऋषी यांच्यावर प्रा. विजय गोविंदराव यंगलवार यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच नागपूरच्या नचिकेत प्रकाशनने केले आहे. महर्षी भृगु, मृंत्युजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी नावाची ही तीन पुस्तके केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर अन्यही समाजातील वाचकांच्या पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहितीत भर घालणारी आहेत.
आपल्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव खरे तर प्रत्येक माणसात आणि विशेषत: प्रत्येक शिक्षित माणसात असावयास हवी, पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे विविध रंगी, विविध ढंगी भारतीय समाजजीवनातील अनेक शाखांचा इतिहास, कर्तृत्व, परंपरा यांची माहितीच काय, अस्तित्व देखील नामशेष झालेले आहे. पण प्रा. यंगलवार यांनी प्रकर्षाने ही जाणीव ठेवून पद्मशाली समाजाचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मशाली यशोगाथा या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने पद्मशाली समाजाच्या सखोल अभ्यासाचा वसा घेतलेल्या प्रा. यंगलवार यांनी, त्या दिशेत पुढचे पाऊल टाकताना महर्षी भृगु मृत्युंजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी या तीन पुस्तकांची एक मालाच जणु समाजपुरुषाच्या गळ्यात टाकली आहे. अशा विषयांवर मान्यवर विद्वान लेखकांकडून मुद्दाम लिहून घेऊन ती पुस्तके प्रकाशित करून ही माहिती हे ज्ञान संपूर्ण समाजापर्यंत नेण्याचे जे धोरण नचिकेत प्रकाशन राबवित आहे त्यासाठी त्यांंचे अभिनंदन केले पाहिजे आणि अन्य समाज पुरुंषावरही त्यांच्याकडून अशीच पुस्तके प्रकाशित होतील. अशी अपेक्षा करू. या ही तीनही पुस्तके अतिशय उत्तम, दर्जेदार व देखणी झाली आहेत. सर्वच मुखपृष्ठ आकर्षक आहेत. दर्जेदार पुस्तकाची परंपरा नचिकेत ने कायम राखली आहे.
महर्षी भृगु :
सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांमध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या भृगु ऋषींची केवळ पौराणिकच नव्हे तर, आज जगात इतस्तत: विखुरलेल्या भृगुकुलोत्पन्नांची साधार व अभ्यासपूर्ण माहिती प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. महर्षी भृगुंच्या जन्माच्या विविध कथा, त्यांचे पौराणिक दाखले, त्यांचा कुलविस्तार, त्यांचे कार्य, त्याचे आध्यात्मिक, सामाजिक महत्व अशी चौफेर माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. सामान्यत: वाचकांना महर्षी भृगुंच्या भृगुसंहिता या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथाचीच माहिती असलेली आढळते. मात्र महर्षी भृगु यांनी ऋग्वेद, अथर्ववेद यांच्यावर केलेले विपुल लेखन, वास्तुशास्त्र, आयुर्वेदसंहिता, भृगुस्मृती, वेदान्तावरील भृगु-गीता आदींचाही परिचय या पुस्तकात लेखक प्रा. यंगलवार यांनी करून दिला आहे. महर्षी भृगु यांच्याशी संबंधित भारतातील प्रमुख स्थाने आणि तेथे होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही लेखकाने रोचकपणे दिली आहे. अवघ्या साठ पानांचे आणि नाममात्र 60 रुपये किंमतीचे हे पुस्तक पद्मशाली समाजासाठी जणु भृगु-पुराणच ठरावे. पृ. 62 किं. 60 रू.
मृत्युंजय मार्कंडेय ऋषी :
महर्षी भृगु यांची कुलपरंपरा फार मोठी आणि कर्तृत्वान वंशजांनी युक्त असली तरी त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते त्यांचे पणतू मार्कंडेय ऋषी यांचे. भृगुंचे नातू मृकंड यांना मोठ्या तपश्चर्येनंतर भगवान शंकराच्या प्रसादाने झालेला हा मुलगा दिगंत कीर्तीवान ठरला. तेजस्वी व कर्तृत्वान मुलगा हवा असेल तर तो केवळ सोळा वर्षेच जगणारा मिळू शकेल, असे भगवान शंकराने वर देतांना म्हटले, तेव्हा मृकुंड-पत्नी मरुध्वती हिने मोठ्या आनंदाने तो मुलगा मागून घेतला. मात्र पुढे या मार्कंडेयाने तपोबलाने व वशिष्ठ आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने मृत्यूवर मात केली आणि दीर्घायुष्य प्राप्त केल. ते मृत्युंजय ठरले, अशी पुराणात कथा आहे. चिरंजीव असलेल्या मार्कडेयांचे सर्व विषयांवरील ज्ञान आणि संशोधन विलक्षण आहे. या पुस्तकात लेखकाने त्याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. याशिवाय प्रसंगानुरूप त्यांनी रचलेले मृत्युंजयस्तोत्र, पितृपीडानिवारक स्तोत्र, त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा, भविष्यवर्णन यांचीही माहिती लेखकाने यात पेरली आहे. मार्कंडेय ऋषींची ग्रंथसंपदा, त्यांनी विविध प्रसंगानुरूप भेटी दिलेल्या स्थानांची माहिती, तेथील दिनविशेष व कार्यक्रम आदींची माहितीही प्रा. यंगलवार यांनी दिली आहे. या पुस्तकात विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मार्कंडा या शिव-तीर्थांची आणि तेथून जवळच असलेल्या आमगाव (महाल) येथील दोन दुर्लक्षित मार्कंडेश्वर मंदिरांची विस्तृत माहिती देखील दिली आहे. भारतीय पौराणिक साहित्यामध्ये जी 18 पुराणे आहेत, त्यात एक अतिशय महत्वाचे असे मार्कंडेय पुराण देखील आहे. मार्कंडेय ऋषींचे पौराणिक महत्व विशद करण्यासाठी याहून अन्य दाखल्याची गरज भासू नये. पृ. 122 किं. 120
वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी :
पद्मशाली समाजाची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली अशी प्रगाढ श्रद्धा या समाजात ज्यांच्याबद्दल आहे, त्या भावना ऋषी यांच्यावर आतापर्यंत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. ती उणीव दूर करण्याचे अतिशय महत्वाचे काम प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकाच्या रूपाने केले आहे. तसे हे अतिशय छोटेखानी पुस्तक असले तरी त्याचे संदर्भाच्या दृष्टीने महत्व फार मोठे आहे. एका पौराणिक कथेनुसार, कालवासुर नामक एका महाविनाशकारी राक्षसाचा वध ब्रह्मदेवाच्या वरदानाने केवळ अयोनिज वीराच्याच हातून घडणार होता. ब्रह्मचारी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञानंतर असा पुत्र यज्ञकुंडातून उत्पन्न झाला. त्याचे नाव भावनारायण. त्याने पुढे त्या राक्षसाचा व त्याच्या कुलाचा नाश केला. हा भावनारायणच पुढे भावना ऋषी म्हणून लौकिक मिळवता झाला. या भावनारायणाने कमलपुष्पाच्या देठापासून तंतू काढून त्याचे तलम वस्त्र तयार केले व ते भगवान विष्णूला अर्पण केले, अशीही एक कथा आहे. त्यावरून त्यांनी हातमागावर वस्त्र विणण्याची कला विकसित केली, हे स्पष्ट होते व म्हणूनच ते या कलेचे प्रणेते मानले जातात. ती कला पुढे त्यांच्या वंशजांनी वाढवली. त्याच योगाने या कुलाचा विस्तार होत पद्मशाली समाज निर्माण झाला. ही सारी कथा प्रा. यंंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. पद्मशाली समाजबांधवांसाठी या तीनही पुस्तकांचे संदर्भमूल्य निश्चितपणे फार मोठे आहे. पण सर्वच समाजासाठी ते मोठे वाचनीय व प्रेरणादायी आहे.पृ. 32 किं.30 रू.
वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 32 किं.30 रू
मृत्युंजय मार्कंडेय ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 122 किं. 120 रू.
महर्षी भृगु : प्रा. विजय यंगलवार / पृ. 62 किं. 60 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
Posted in Uncategorized | Leave a Comment »
गौरवशाली भारतीय कालगणना पुन्हा सर्वत्र प्रचलित व्हावी. यासाठी एक उपक्रम म्हणून नचिकेत प्रकाशनाने युगाब्द तिथी दैनंदिनी 5113 तयार केली आहे. खिशात मावेल अशी ही दैनंदिनी 64 पानांची असून त्यात भारतीय कालगणनेची संपूर्ण वैज्ञानिक माहिती आहे. तसेच अयन, महिना, पक्ष, तिथी, वार आदी सर्व काही 1 एप्रील ते 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा कालखंडही यात समाविष्ट आहे. त्यामुळे ती अधिकच उपयुक्त झाली आहे. अशी ही दैनंदिनी प्रथम वर्ष म्हणून फक्त 10 रु. ला उपलब्ध आहे. अधिक प्रतींसाठी संस्थेला संपर्क करावा.
Posted in Uncategorized | 3 Comments »
नचिकेत प्रकाशनाच्या “पर्जन्यचक्र” आणि “आधुनिक भारतीय गणिती” या दोन पुस्तकांचे मुंबईत प्रा. मोहन आपटे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई ता.
जीवनसृष्टी चा आधार असलेले पर्जन्यचक्र सोप्या भाषेत, साधार समजावून देणारे प्रा. सौ. उमा पालकर यांचे पर्जन्यचक्र : मेघ, वीज, वादळवारा आणि पाऊस तसेच भारतीयांचे गणितातील कर्तृत्व सांगणारे प्रा. स.पां. देशपांडे यांचे आधुनिक भारतीय गणिती या नागपूर येथील नचिकेत प्रकाशनाच्या दोन चांगल्या पुस्तकांचे प्रकाशन मुंबईत कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रसिद्ध विज्ञान लेखक प्रा. मोहन आपटे यांच्या हस्ते शनिवारी 18 जूनला झाले.
मराठीतून विज्ञान लिहिणारे लेखक वाढले पाहिजे.
मराठीमध्ये विज्ञानाची नवनवीन पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे. तरच मराठी समृद्ध व उपयुक्त होत जाईल. मराठीला अजिबात मरण नाही. काही शहरी भाग सोडला तर सर्वदूर मराठीला पर्याय नाही, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मोहन आपटे यांनी ठामपणे सांगितले. दोन्ही लेखकांचे अभिनंदन करून प्रा. आपटे म्हणाले, ङ्कविज्ञानावर मराठीतून लिहिणारी मंडळी वाढली पाहिजे.ङ्ख
माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात हा अतिशय नेटका व भरगच्च प्रकाशन सोहळा झाला. मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त सहकार्याने नचिकेत प्रकाशनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभेत प्रमुख वक्ते म्हणून आय.आय.टी. मुंबई येथील गणिताचे प्राध्यापक डॉ. शरद साने आणि मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे हे दोन प्रमुख वक्ते होते.
प्रा. सौ. सुरेखा जोशी यांनी पर्जन्यचक्राचे कारण असणाऱ्या सूर्याचे स्तोत्रस्तवन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. नचिकेत प्रकाशनाचे श्री. अनिल सांबरे यांनी सर्व अतिथी आणि दोन्ही लेखक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालनकर्त्या प्रा.डॉ. कमल अभ्यंकर यांनी सर्व अतिथींचा आणि लेखकद्वयाचा परिचय करून दिला. श्री. अनिल सांबरे यांनी नचिकेत प्रकाशनांची माहिती देऊन अशा पुस्तकांच्या प्रकाशनामागील भूमिका स्पष्ट केली.
पर्जन्यचक्र हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? या बाबत आपण लिखाण कसे केले ? हे सांगून या पुस्तकात सर्व अद्ययावत माहिती साधार, सचित्र पण सोप्या भाषेत मांडण्यास प्रयत्न केला आहे. असे प्रा. सौ. उमा पालकर यांनी सांगितले.
53 वर्षांपासून गणिततज्ञांवर आणि गणितावर सातत्याने लिहिणारे प्रा. स. पां. देशपांडे यांनी गणितावरील त्यांच्या लिखाणाची सुरुवात कशी झाली, हे सांगून या लिखाण प्रवासाची व त्यातील काही प्रसंगाची गमतीदार माहिती सांगितली.
आधुनिक भारतीय गणितीं पुस्तकामध्ये ज्यांच्या कार्यावर प्रकाश टाकले आहे असे दोन भारतीय गणिती या वेळी उपस्थित होते. डॉ. दाणी आणि डॉ. घोरपडे या दोन थोर भारतीय गणितींचा यावेळी अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. शरद साने यांनी प्रामुख्याने आधुनिक भारतीय गणिती या पुस्तकातील व्यक्तिरेखांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या प्रमाणेच आणखी काही आधुनिक भारतीय गणितींवर लिहिण्याची व ते प्रकाशित करण्याची आवश्यकता व अपेक्षा त्यांनी लेखक/प्रकाशक यांच्याकडून व्यक्त केली.
श्री. अ. पां. देशपांडे यांनी दोन्ही पुस्तकांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवली तसेच अशी पुस्तके लिहिल्याबद्दल व प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी लेखक-प्रकाशक दोघांचेही अभिनंदन केले. प्रकाशक श्री. सांबरे यांनी आभार मानले. प्रा. सौ. सुरेखा जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शैक्षणिक क्षेत्रातील अभिजात मंडळी याप्रसंगी मोठ्या संस्थेने उपस्थित होती. प्रा. सौ. प्रतिभा बर्वे, प्रा. डॉ. वंदना रेगे, श्री. मोहन कान्हेरे आदीचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
नचिकेत प्रकाशनातर्फे आठ विज्ञान पुस्तकांचा संच प्रसिद्ध
नागपूर ता.
विज्ञान व माहितीपर तसेच वैचारिक प्रकाशनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने एकदम आठ विज्ञान पुस्तके प्रकाशित केली आहेत. विज्ञानाचे सर्व विषय मराठीतून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न नचिकेत प्रकाशन करीत असते. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नचिकेत विज्ञान ज्ञानयज्ञ या योजनेअंतर्गत ही पुस्तके प्रकाशित होत आहेत.
जीवसृष्टीचा आधार असलेले पर्जन्यचक्राची या विस्मयकारी व शास्त्रीय माहिती साधार समर्पक सोप्या भाषेत समजावून देणारे प्रा. सौ. उमा पालकर यांनी लिहिलेले पर्जन्यचक्र : मेघ, वीज, वादळवारा आणि पाऊस, भारतीय गणिती या पुस्तकानंतर भारतीयाचे गणितातील योगदान सांगणारे आधुनिक भारतीय गणिती हे प्रा. स. पां. देशपांडे यांचे पुस्तक. तसेच यंदा जागतिक रसायनशास्त्र वर्ष जाहीर झाले आहे. त्यानिमित्त मुद्दाम लिहून घेतलेले. जागतिक रसायनशास्त्रज्ञ हे पुस्तक प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी लिहिले आहे. याशिवाय पुण्याचे ज्येष्ठ विद्वान व विज्ञान लेखक श्री. गोविंद सरदेसाई यांनी लिहिलेली पाच पुस्तके, शोध मंगळाचा, यमदूती सुनामी, जागतिक तापमान वाढ, विनाशाच्या वाटेवरील प्राणी, आणि सजीवांचे जीवनकलह ही पाच पुस्तके अशी एकूण आठ पुस्तकांचा संच नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
आधुनिक भारतीय गणिती आणि पर्जन्यचक्र या दोन पुस्तकांचे मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशन नुकतेच झाले. नचिकेत प्रकाशनाची पुस्तक प्रकाशनाच्या शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. एकूण आठ पुस्तकांचा हा संच 945 रू. ला आहे. मात्र संच घेणाऱ्यांना तो फक्त 850 रू. मिळू शकेल. या योजनेचा अधिकाअधिक शाळा, ग्रंथालये तसेच संस्था व चोखंदळ वाचक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नचिकेत प्रकाशनाचे श्री. अनिल सांबरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : नचिकेत प्रकाशन
टेलिफॅक्स : 9225210130, 8149930004
Posted in Uncategorized | Leave a Comment »
नकळत येणारी संकट परंपरा सांगणारे
जागतिक तापमान वाढ
आजकाल पर्यावरण प्रदुषण हा विषय ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. प्रत्येक न्युज चॅनलवर अधूनमधून या विषयी नवनवीनच माहिती देणं सुरू असतं. या सर्वात परवलीचा शब्द असतो, ग्लोबल वॉर्मिंग. बच्चे कंपनींना तर हा ग्लोबल वॉर्मिंग विज्ञानाच्या पुस्तकातून सतत भेटतच असतो. त्यांना या विषयावर निबंध स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धातून बोलतं केलं जातं. इतका ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ हा विषय ग्लोबल आहे. अशावेळी आपण त्या विषयी अनभिज्ञ राहून कसं चालेल? नेमकं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आहे तरी काय? ते कशामुळे होतं? त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत? ग्रीनहाऊस, गॅसेस, ओझोन होल हे या संदर्भात काय परिणाम करतात? हे सारे प्रश्न तुमच्या मनात असतील तर जागतिक तापमान वाढ हे पुस्तक अवश्य वाचा.
या पुस्तकाचे लेखक आहेत श्री. गो. बा. सरदेसाई आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास स्पष्टता हे एक ठळक वैशिष्ट्य सांगावं लागेल. पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकातील विषयाचं गांभीर्य दर्शविते. लेखकाने वैज्ञानिक शब्द मराठीतून मांडले आहेत. परंतु ते मराठीतूनच वाचतांना बोजड वाटू नये याचीही काळजी लेखकाने घेतली आहे. प्रत्येक मराठी वैज्ञानिक शब्दाला प्रचलीत इंग्रजी शब्द तिथल्या तिथे देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते.
जागतिक तापमान वाढ हा विषय समजावून सांगतांना लेखकाने वाचकांचे ज्ञान गृहीत न धरता आवश्यक त्या सर्व व्याख्या पुरेशा तपशिलासह समजावून सांगितल्या आहेत. जसे अल्ट्रा वायलेट रेंज म्हणजे अतिनील किरणं म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह वायू म्हणजे काय? हे समजावून सांगतांना छोट्या छोट्या प्रकरणांच्या स्वरूपात माहिती दिली आहे. प्रकरणं छोटी-स्वतंत्र असल्याने विषयाचा क्लिष्टपणा कमी झाला आहे. तसेच एखादी संकल्पना पुन्हा समजावून घ्यायची झाल्यास चटकन शोधून काढता येते. संपूर्ण पुस्तकात शोधण्याची गरज भासत नाही.
या पुस्तकात एकूण तेवीस प्रकरणे आहेत. त्यापैकी पहिली पाच प्रकरणे लेखकाने आवश्यक असे प्राथमिक ज्ञान समजावण्यासाठी वापरली आहेत आणि मग 6 व्या प्रकरणापासून मूळ विषयाला हात घातला आहे. जागतिक तापमानात वाढ कशी होते? त्यात हरितगृह वायू मुख्य भूमिका कशी वठवितात? हे सारे लेखकाने टप्प्या टप्प्याने मांडले आहे. हरितगृह वायू ही संकल्पना कुठे, कशी उदयाला आली. त्यात निसर्ग कसा मदत करतो? परंतु मानव निर्मित हरितगृह वायूने जागतिक तापमान वाढीवर कसे अनिष्ट परिणाम होतात, हे समजावून सांगायला लेखकाने जवळ जवळ दहा छोटी छोटी प्रकरणे घेतली आहेत. पुढे ओझोन हे पृथ्वीचं सुरक्षाकवच कसं तयार होतं? त्याचं कार्य काय? त्याच्यात झालेले बदल जागतिक तापमानावर कसे परिणाम करतात? ध्रुवीय परिसरावर या तापमान वाढीचा काय परिणाम होईल हे सारे लेखकाने अतिशय स्पष्टपणे मांडले आहे.
पुस्तकातील शेवटचे प्रकरण ङ्कनकळत येत असलेली संकट परंपराङ्ख हे हादरवून टाकणारे आहे. हे प्रकरण आकडेवारीने परिपूर्ण असे आहे. अद्ययावत माहितीच्या आधारे तापमानात 10ल, 20ल, 30ल, 40ल, किंवा 50ल, ने वाढ झाल्यास काय परिणाम होतील हे सांगितले आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य वाढते.
जागतिक तापमान वाढ याविषयी प्रस्तुत पुस्तक हे पाठ्यपुस्तक नाही असे जरी प्रकाशक व लेखक म्हणत असतील तरी विषय पुरेशा गांभिर्याने व तपशीलासह दिल्याने प्रभावी झाला आहे. एखादा गंभीर विषय असतांना जगभरात त्या दृष्टीने ठोस पावले का उचलल्या जात नाही प्रश्न मनात येत असेल तर, त्याचेही समाधान या पुस्तकात आहे. उपाययोजना करतांना संपूर्ण जगावर त्याचे काय दुष्परिणाम होतील किंवा उपायांसाठी काय प्रतिक्रिया जगभर उमटतील याची चर्चा सुद्धा पुस्तकात आहे. त्या चर्चेला पुढे नेऊन तापमान वाढीवर ठोस उपाय शोधले जावे, या साठी मन बेचैन होते, यातच पुस्तकाचे यश आहे.
जागतिक तापमान वाढ : सौ. आरती देव
लेखक : गो. बा. सरदेसाई
पृष्ठ संख्या : 76, किंमत : 80 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
Email : nachiketprakashan@gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
प्राणी जगतातील धोके उलगडणारे शास्त्रीय पुस्तक
विनाशाच्या वाटेवरील प्राणी
नचिकेत प्रकाशनाचे विनाशाच्या वाटेवरील प्राणी हे श्री. गो.बा. सरदेसाई यांचे एक छोटेखानी वैज्ञानिक माहितीवर आधारित असलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. शोध मंगळाचा, यमदूती सुनामी आणि सजीवांचे जीवनकलह या धर्तीवरचे हे आणखी एक पुस्तक आहे. यात एकूण 41 प्राण्यांचे वर्णन केले गेले आहे. त्यांचे 2 विभाग करून पहिल्या भागात पूर्णपणे नष्ट झालेल्या आणि दुसऱ्या भागात नष्टप्रायतेकडे वाटचाल करणारे म्हणजे संकटग्रस्त प्राण्यांचा समावेश आहे. सुरवातीलाच पुस्तकाच्या प्रयोजनाबाबत लेखकाने वाचकांना सजग केले आहे. 4 अब्ज वर्षांच्या कालावधीत असंख्य सूक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी पृथ्वीवर उत्पन्न झाले आणि नष्ट झाले. 1 लक्ष वर्षांपूर्वीच्या काळात नष्ट झालेल्या प्राण्यांना नष्ट करणारी कारणे म्हणजे जंगलातील वणवे उल्कापात, पूर वगैरे होती. पण पृथ्वीवर मानवाचा अवतार झाल्यामुळे त्याच्या पोटाची भूक, वापरायच्या वस्तू आणि सुविधा यासाठी होणारी जंगलकटाई ही अनेक प्राण्यांना नष्ट करणारी कारणे ठरतात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवजंतूंची बेसुमार हत्या होते आणि काही प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे माणूस हा जीव सृष्टीच्या विनाशाचा महत्वाचा घटक ठरतो, असा इशारा ते देतात.
नष्ट झालेल्या प्राण्यात 14 व्या शतकातील क्वागा हत्ती पक्षी व नंतरचे डीडी, टास्मानियन लांडगा, मोआ, प्रवासी कबुतर व स्टेलरची सागरगाय या प्राण्यांचे वर्णन येते. युरोप, उत्तर-दक्षिण, अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटाटिर्रकाच्या बर्फाळ भागातील अशा सर्वच भागातील प्राण्यांचे (नष्ट व नष्टप्राय वर्गातील) वर्णन या 41 प्राण्यांतून घडते, आणि हे प्राणी नष्ट होण्याची कारणेही लेखक देतात. संकटग्रस्त म्हणजे अजून काही प्रमाणात अस्तित्वात असणारे पण योग्य काळजी न घेतल्यास नष्ट होऊ शकणाऱ्या प्राण्यांबाबतची शास्त्रीय माहिती हे पुस्तक देते, ती उद्बोधक आहे, तशीच मनोरंजकही आहे. निसर्गातील वैविध्य तर त्यामुळे कळतेच. परंतु जीवनकलहाची धारही उमजून येते.
गोरिला हा मानवसदृश प्राणी, ज्याची कातडी अन् कवटी मिळावी म्हणून माणूस त्याची कत्तल करतो. ओरांग उटाण हा आग्नेय आशियातील प्राणी. हाही एक प्रकारचा कपि म्हणजे माकड पण लहानसा 120 से. मि. उंचीचा आणि सवयींचे बाबत मानवाशी साम्य असणारा. हा प्राणी खिळे ठोकणे आणि नटबोल्टचे नट सैल आणि घट्ट करू शकतो म्हणून युरोपीय लोक पिले पळवून नेतात, परिणामी अनेक प्राणी मरतात, तसेच शशकर्ण बॅन्डीकूट हा ऑस्ट्रेलियातील प्राणी त्याच्या केसाळ कातडीसाठी मारला जातो. काकापासारखा उडू न शकणारा पक्षी त्याच्या रंगीबेरंगी पिसांसाठी मारला जातो. या प्राण्याला 2 मोठे सुळे (हत्तीप्रमाणे) असतात, त्याच्या कातडीखाली खूप जाडीचा चरबीचा थर असतो त्या चरबीसाठी ह्या प्राण्यांना त्यांच्या शंभरहून अधिक समूहातून ओढून मारून टाकले जाते.
प्राण्यांच्या मृत्यूचे कारण, त्यांच्या शरीरातील मांस, चरबी किंवा कातडी, केस, खुरे, दात असे काहीही असले तरी त्याच्याशी मानव जमातीची लोभी प्रवृत्तीच कारणीभूत होते, हे कळले की मन विषण्ण होते. कृषीक्षेत्राची वाढण्यासाठीची जंगलकटाई, घरे बांधण्यासाठी लागणारा लाकूडफाटा, वाळूचा उपसा, पर्सेस, जोडे, बॅगा यासाठी होणारी हत्या इतके सांगण्यासाठी हे पुस्तक आहेच, पण सामान्य वाचकाला नकळत प्राणी-त्याच्या सवयी, आढळण्याच्या जागा, खाण्यापिण्याची साधने, राहण्याच्या जागा याबाबतही विपुल माहिती हे पुस्तक थोडक्या शब्दात देते. प्रत्येक प्राण्यासाठी 1-2 पाने मजकूर असून त्यात त्या प्राण्याचा प्राणीवर्ग, रूप, रंग, वैशिष्ट्ये देण्याला जो प्रयत्न लेखकाने केला आहे. त्याचवेळी त्या प्राण्याचे जीवनविश्र्वच उलगडून जाते. घागरीत सागरदर्शनाप्रमाणे छोटे पण माहितीपूर्ण असे हे पुस्तक आहे.
वाचता वाचता कळणारी माहिती रंजनापेक्षा जागरूक करणारे चित्तभान उजळते, हे या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य. सिंह या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे कळपातील मोठा नर व इतरही नर शिकारीत भाग घेत नाहीत. माद्या शिकार साधतात. गवताआड लपतछपत जाऊन प्राण्याला घेरतात, पाठलाग करून मारतात-ओरबाडतात शिकार पूर्ण झाली की नरसिंह पुढे येतात आणि लचके तोडून मांस खातात पण कळपात साम्राज्य मात्र राहते ते सिंहाचे, सिंहिणीचे नाही आहे की नाही सृष्टीची गंमत. माळढोक हा पक्षी बहुपत्निक आहे त्याच्या जनानखान्यात 5-6 माद्या असतात. अस्वल फळे, मध कीटक, पक्षांची प्राण्याची अंडी खातात, मांसाहार अगदी मर्यादित स्वरूपात करतात. आय आय प्राणी झाडाची साल कुरतडून, बुंध्याच्या भोकात बोटे खूपसून सुरवंट व इतर किडे खातात. ऍडॅक्स हा आफ्रिका खंडातील हरिण सदृश प्राणी जानेवारीत दक्षिणेकडील सरोवराजवळ जातात. गवत व रानटी फळातून त्यांना प्राणी मिळते. मोजेबंद सर्प बिळात (30-40 जण) चिकटून राहतात. त्यामुळे त्यांना उब मिळते. रेशमी चमकदार पायमोज्यांप्रमाणे हे दक्षिण अमेरिकेतील सर्प मानवी वसाहतींमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ऑस्ट्रेलियातील बांबट प्राण्याचे डोळे ओलसर असतात. सिंह पुच्छ मर्कट ही माकडे पूर्वी कर्नाटकात होती. आता क्वचित कुठे आढळतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना अजिबात आवाज करीत नाहीत. ह्याचा शत्रू बिबट्या वाघ आहे. नील तिमी हा निळा देवमासा हा दक्षिण ध्रुवाजवळील सागरात असतो. हा एक सस्तन प्राणी मासा आहे. मादीची गर्भधारण 323 दिवसांची असते. तिला 6.7 मीटर लांब, 2 टन वजनाचे एकच पिल्लू होते. स्पेक्टॅकल्ड बेअर याच्या डोळ्याभोवतीच्या रंगीत वलयाने जणुकाही त्याने चष्मा घातल्याप्रमाणे दिसतो. समुद्र गाय (ड्युगांग) हे निकोबार जवळील आढळणारी प्राणी कळपाने राहतात. (समुद्रात हिंडतात) बीव्हर प्राण्याचे घरटे पाण्यात बांधले जाते. कॉन्डार पक्षी घरटे बांधत नाहीत. माद्या अंडी, उंच जागी असणाऱ्या खडकांचा आडव्या रूंद कंगोऱ्यात घालतात. कोआला प्राण्याला पाण्याची गरज नसते. ऑस्ट्रेलियातील हा प्राणी ठराविक जातीचीच पाने खातात. तीही फार कोवळी नाही, फार जरडही नाहीत अशीच त्यांना हवी असतात. योग्य आहार न मिळाल्यास हे प्राणी उपोषण करतात व प्राणत्याग करतात. प्राण्यांचा आकार, रंग, वसतीस्थान, शास्त्रीय नाव, शास्त्रीय वर्गीकरणातील स्थान, खंड देश व राहण्यास व जगण्यास आवश्यक हॅबीटॅट/परिसर या सर्वांसह त्यांच्या आवडीनिवडींचे वर्णन करून त्यांच्या नाशासाठी पर्यायाने त्यांच्यातील एखादी चांगली गोष्टच कशी कारणीभूत होते हे गो.बा. सरदेसाई यांनी आटोपशीरपणे वर्णिले आहे. कुमारवयातील मुलांसाठी हा एक बौद्धिक मेवाच आहे. प्रौढांनाही पुष्कळ काही नवे कळते.
ङ्कजिवंत बहुबोलके अतिसुरम्य ते उत्पल
नरे धरूनि नाशिले खचित थोर बुद्धिबळङ्ख
या टिळकांच्या ओळींची प्रचिती हे पुस्तक वाचून येते.
उत्तरा हुद्दार, 15, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर 440 022
विनाशाच्या वाटेवरील प्राणी
लेखक : गो. बा. सरदेसाई
पृष्ठ संख्या : 106, किंमत : 110 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
Email : nachiketprakashan@gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
माहितीपूर्ण पण वाचनीय “पर्जन्य चक्र” !
उन्हाने काहिली होत असताना नचिकेत प्रकाशन चे “पर्जन्य चक्र” हाती आले. प्रा. उमा पालकर या विद्वान प्राध्यापिकेने लिहिलेले हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. अभ्यासपूर्ण आहे परंतु कुठेही किचकट, रटाळ झालेले नाही. पर्जन्य, हवामान, मेघ, वादळे यांची शास्त्रोक्त माहिती अतिशय रोचक भाषेत दिली आहे. सामान्यांना या सगळ्या विषयांची माहिती होते आणि अभ्यासू लोकांना देखील हे पुस्तक आपले वाटते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
उत्तम आणि सोप्या आकृत्या, विषयाचे सहज विवेचन, एखादा कठीण मुद्दा रंजकतेची जोड देऊन सोपा करून सांगणे, यामुळे पुस्तक वाचताना उत्सुकता कायम राहते. हवामान म्हणजे काय ते कळले मग याचा अंदाज कसा घेत असतील? हवामानाचा अंदाज चुकतो का? असे प्रश्न मनात येत असतानाच अगदी आपसूक त्या माहितीपाशी येतो. मेघ कसे तयार होतात? हवेचा महासागर म्हणजे नेमके काय? या महासागराला भरती येते का? वीज म्हणजे काय? मेघांना, वादळांना नावे कशी देतात? वादळाची तीव्रता कशी मोजतात? टोर्नाडो म्हणजे नेमके काय आणि त्या वर चित्रपट कसे निघाले? त्यात दाखवलेले शास्त्रीय दृष्ट्या खरे होते का? असे सामान्य वाचकांना कायम कुतूहल असणारे विषय उत्तम रीत्या या पुस्तकाने मांडले आहेत. या शिवाय सूर्य मालेतील इतर ग्रहांवर येणारी वादळे, मेघ, तिथले हवामान यांचाही आढावा यात घेण्यात आला आहे.
प्रा. उमा पालकर यांना 38 वर्षांचा शिकवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करण्याचा अनुभव आहे. त्यांनी व्याख्यानेही दिली आहेत. पुस्तक वाचताना या सगळ्याचा फायदा वाचकाला होतो. सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी आणि तरीही नवीन आश्चर्यकारक काहीतरी मांडण्याची शैली वाचकाला पुस्तक वाचताना खिळवून ठेवते आणि त्या मुळेच क्लिष्ट विषयावरील हे पुस्तक असूनही कुठेही त्याचे रूपांतर ङ्कपाठ्यङ्ख पुस्तकात होत नाही !
मान्सून हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय! त्यांचे जीवनच त्यावर अवलंबून. त्यामुळेच पर्जन्य चक्रात त्याचा प्रामुख्याने उहापोह होणे अर्थातच अपेक्षित होते. आणि प्रा. पालकर यांनी या विषयाला पूर्ण न्याय दिला आहे. मान्सूनची सगळी माहिती यात आहे. त्यामुळे आता पाऊस पळाला, पाऊस अति झाला, अशा बातम्या आल्या की त्यामागील नेमके विज्ञान आपल्याला कळू शकणार आहे. हवामान बदल आणि त्या अनुषंगाने होणारे परिणाम यांचाही परामर्श यात चांगला घेण्यात आला आहे.
हे सगळे लिहिताना त्या त्या विषयाशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींचा उल्लेख यात आला असल्याने इतिहास आणि वर्तमान घडामोडीशी आपण जोडले जातो.
नचिकेत प्रकाशन अभ्यासपूर्ण विषय सामान्यांना रोचक वाटेल अशा भाषेत पुस्तक काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पुस्तकही या परंपरेत मानाचा तुरा खोवणारे झाले आहे. उत्तम छपाई , फार भपका नाही परंतु दर्जात कुठेही तडजोड नाही या मुळे वाचनाचा आनंद वाढतो. मुद्रा राक्षसाचे प्रताप आहेत पण अगदीच थोडे आणि सहज दुर्लक्ष करता येण्याजोगे !
शेती, पाऊस, वादळे यामुळे सतत आपल्या आयुष्यात बदल होत असतात. महागाई वाढते तर कधी सगळे आलबेल असते. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असलेला हा विषय घरातील प्रत्येकानं माहीत करून घ्यावा, असा अनिवार्य आहे. चटपटीत रेसिपीज वाचणाऱ्यांनी तर अधिक आवर्जून वाचावे, कारण मेघ आहेत तर शेती आहे आणि जिभेचे चोचले आहेत!!
एका चांगल्या विषयाची उत्तम मांडणी झाली की पुस्तक वाचनीय होते हे या निम्मिताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले!
“पर्जन्य चक्र” (मेघ, वीज , वादळवारा आणि पाऊस.) सोनाली कोलारकर-सोनार
लेखिका : प्रा. उमा पालकर 9422106586
पृष्ठे: 166, किमत : 170 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
Email : nachiketprakashan@gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
संस्थेतर्फे कर्मचारी/विद्यार्थी सदस्य यांना पुस्तक भेट योजना
स.न.वि.वि.
विषय : वाढदिवशी पुस्तक भेट देणे
आपली संस्था/उद्योग/प्रतिष्ठान एक अत्यंत उत्तम, प्रागतिक विचारांची आणि समाजातील चांगल्या बाबींना सक्रिय प्रोत्साहन देणारे आहात. त्याकरिता सर्व प्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन.
समाजात चांगले विचार पोहचावे, रूजावे यासाठीच नचिकेत प्रकाशन पण सदैव प्रयत्नशील असते आणि त्यादृष्टीने अनेकानेक चांगली माहितीपूर्ण प्रकाशने प्रकाशित करीत असते. ही पुस्तके सर्वापर्यंत पोहचावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतोच. या कामी आपले सहकार्य मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे आणि ते मिळेलच, हा विश्वासही आहे.
सहकार्य संदर्भात योजना अशी :
आपल्या येथील कार्यकर्ते/कर्मचारी/सदस्य/विद्यार्थी यांचे वाढदिवस आपण आपल्या येथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरे करीत असालच. यापुढे आपण त्यांना अशा प्रसंगी एक उत्तम पुस्तक भेट दिले तर ते त्यांच्या जीवनावर चांगले परिणाम करणारे ठरू शकते. व्यक्ती म्हणून त्यांच्यासाठी आणि संस्था म्हणून आपल्यासाठीही ते चांगले ठरेल. म्हणून आपण वाढदिवशी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबवावा, असे वाटते. हा उपक्रम आपल्या येथे सहज राबविता यावा या करिता आम्ही एक उपाय सूचवित आहोत.
यानुसार वर्षभरात किती जणांसाठी ही योजना राबवायची आहे तो आकडा नक्की करावा. आमच्या सूचीतून हवी ती पुस्तके निवडून त्यांच्या आवश्यक तितक्या प्रतींची मागणी आमच्याकडे करावी. त्यानुसार ही पुस्तके आपल्याला घरपोच पाठविली जातील आणि त्याच्या आधारे आपण येथे विनासायास हा उपक्रम वर्षभर राबविला जाऊ शकतो. आपण जितक्या जास्त प्रती घ्याल तितकी कमी खर्चात आपली खरेदी होऊ शकेल. बचतीचा तक्ता खालीलप्रमाणे राहील.
एका पुस्तकाच्या प्रती 5 10 25 50 100
सूट 10% 15% 20% 22.5% 25%
- आपल्या नजिकच्या/नेहमीच्या ग्रंथविक्रेत्या मार्फतही आपण या योजनेत सहभागी होऊ शकता.
- पुस्तके आमच्या खर्चाने पाठवू. नचिकेत प्रकाशनाची यादी जोडली आहे. यानुसार आपली मागणी कळवावी आणि सोबत त्या रकमेचा डीडी नचिकेत प्रकाशन नावे पाठवावा, ही विनंती. आपण रक्कम आमच्या खात्यातही जमा करू शकता. धन्यवाद
वैयक्तिक व आप्तमित्रांसाठी ग्रंथसंग्रह योजना
- वैयक्तिक चोखंदळ ग्राहकांच्या स्वत:च्या ग्रंथ खरेदीसाठी तसेच आपल्या मित्रांना चांगली पुस्तके भेट देण्यासाठी ही योजना आहे.
- नचिकेत प्रकाशनाचे हवे ते पुस्तक देशभरात कोणालाही तुमच्या वतीने भेट म्हणून वाढदिवस किंवा विशिष्ट दिवसाला मिळेल.
- हवे त्या पुस्तकाचे नाव, तुमचा पत्ता, ज्याला पाठवायचा त्याचा संपूर्ण पत्ता फोन मोबाईल आणि आवश्यक रकमेसह किमान 8 दिवस आधी आम्हाला मिळायला हवा.
- सोबत तुमच्या वतीने डचड/फोन रंगीत शुभेच्छा पत्राद्वारे त्या व्यक्तीचे अभिनंदन/अभिष्टचिंतन केले जाईल.
- दर वेळी रक्कम पाठविणेचा त्रास वाचावा म्हणून वर्षभर ज्यांना पुस्तक पाठवायचे त्यांची यादी, दिवस आणि संपूर्ण रक्कम पाठवावी. आपल्या सूचनेनुसार अगदी खात्रीलायक रीत्या त्या तुमच्या आप्तमित्रांना ही पुस्तके भेट म्हणून तुमच्या वतीने पाठवली जातील.
- या योजनेत ठरविलेल्या पर्यायानुसार योग्य ती रक्कम जमा करणे व वर्षभरात तिचा विनियोग करणे आवश्यक आहे.
- योजनेचा काळ 1 वर्ष राहील.
- योजनेची सदस्यता नि:शुल्क आहे.
- आपल्या नजिकच्या/नेहमीच्या ग्रंथविक्रेत्या मार्फतही आपण
या योजनेत सहभागी होऊ शकता.
वैशिष्ट्ये :
- सूट विद्यमान पुस्तकांवर दिली जाईल. ्र पाठविण्याचा खर्च 30 रू. प्रति पुस्तक राहील.
पाठविण्याच्या वेळा रक्कम सूट शुभेच्छा पद्धत
3 700 7.5% एसएमएस
6 1300 10% फोन
12 2500 15% शुभेच्छा पत्र
- पाठविण्याच्या वेळा किंवा रक्कम यापैकी जे अधिक असेल त्याप्रमाणे सूट लागू होईल. यापैकी योग्य तो पर्याय निवडून तितकी रक्कम आगाऊ पाठवायची आहे. सोबतच आपले नाव, पत्ता, फोन शिवाय कोणाला, केव्हा व कोणते पुस्तक पाठवायचे हे कळवायचे आहे. कृपया खालील तक्त्यानुसार माहिती कळवावी. ही विनंती
नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
Email : nachiketprakashan@gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
“यमदूती सुनामी”
नाशाला कारणीभूत असणाऱ्या जगन्मान्य सुनामी लाटा या फार पूर्वीपासून उत्पन्न होत आल्या आहेत. फक्त त्यांचे नाव आपल्याला आत्ता माहीत झाले, परंतु नासधूस मात्र पूर्वीपासूनच सुरू आहे. त्या काळातील अनुभवी नाविकांना मात्र लक्षणांवरून संकटांची कल्पना येत असे. नुकसान, जिवीत हानी, आतासारखीच होत असे पण कारण कळत नसे. या सुनामी विषयी सर्वंकष माहिती देणारे, उत्तम पुस्तक श्री. गो. बा. सरदेसाई यांनी लिहिले असून नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने ते दर्जेदार रीत्या प्रकाशित केले आहे.
सर्व सामान्य लाटा किनाऱ्याकडे येतांना त्यांचा वेग कमी होतो. पण सुनामी लाट उत्पन्न झाल्यावर तिची जी उंची असते, जणू एखादी भिंतच धावत येत आहे अशी असते, ती किनाऱ्याला आली तरी कमी होत नाही आणि म्हणूनच ती परत जातांना, मोठी घरे, माणसे, गाड्या वगैरे सर्व आपल्याबरोबर समुद्रात नेते. शिवाय येताना जमिनीचा फार मोठा भाग व्यापून टाकते आणि मग अतिशय नुकसान होते आणि महासागरात मध्यभागी समुद्र खूप खोल असतो, अशा भागात लाटांची उंची खूप कमी असते. त्यामुळे प्रवाशांना कल्पना येत नाही. पण उथळ किनारा येईपर्यंत लाटांची उंची वाढत जाऊन 30 मी. उंचीपर्यंत लाट जाऊ शकते आणि मग ती किनारपट्टीला विध्वसंक ठरू शकते.
सुनामींची उत्पत्ती ही भूकंपामुळे होते. सागराच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे होत असते. सागरात असताना त्या सौम्य दिसल्या तरी किनारपट्टीवर त्या रौद्ररूप धारण करतात. (इतर सामान्य लाटांच्या अगदी विरूद्ध क्रिया) अशा लाटा म्हणजे महासागरात उत्पन्न होणारे जलतरंग आणि असे तरंग हे सागरातील भूकंपानंतर उत्पन्न होतात. तरंग आणि भूकंप याविषयी माहिती करून घेतल्या नंतरच सुनामी प्रकार नीट कळू शकतो आणि हेच सर्व आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. या तरंगांचे प्रकार उदा. प्राथमिक तरंग, कर्तर तरंग, दीर्घ तरंग, रॅले, प्रीत वगैरे. त्यांचा वेग (प्रत्येकाचा वेगळा) कळतो. शिवाय तरंगांची दोलने, तरंगांची गती ही अंतराप्रमाणे वेगळी असते, ती कशी? हेही कळते.
हिमनगाप्रमाणे सुनामी लाटांचा मोठा भाग महासागरांच्या तळाशी दडला असतो. किनाऱ्याकडे येताना लांबी कमी होत उंची वाढत जाते. आणि त्यावर विध्वंस अवलंबून असतो. गंमत म्हणजे सुनामी हा शब्द जपानी आहे. जपानी भाषेत सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाट, म्हणजेच बंदराजवळ आलेली लाट!
या लाटांची निर्मिती ही शक्तिशाली भूकंप, उद्रेक, त्यांचा काळ, वेग, वेगाप्रमाणे उंची किती असते? वगैरे सुनामी लाटांची वैशिष्ट्ये, भूकंपाचे कारण, वगैरे बरीच सखोल माहिती मिळते. भूकंप निर्मित सुनामी लाटा कशा? त्या भूकंपाचे कारण वगैरे गोष्टी ह्यात सविस्तर दिल्या आहेत. शिवाय अशा कोणत्या घटना असू शकतात कि ज्यामुळे (आधी समजल्या तर) नुकसान कमी होईल व प्राणहानी तरी वाचू शकते ते इथे फार चांगल्या प्रकारे व सविस्तर सांगितले आहे.
उदा. आकाशातील उपग्रहांची मदत, पक्षांच्या हालचाली, वेगवेगळ्या देशातील उपग्रहे यांच्या माध्यमातून 4-6 तास आधी कशी मिळू शकते? ह्या लाटांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कसे कार्य करते आणि ते कार्य किती आवश्यक आहे ही बाब सूचित केली आहे. ही माहिती वाचून वेळ आल्यास जीव कसा वाचवता येईल इतरांनीही ही माहिती देता येईल. एकूण हे पुस्तक वाचून सुनामी लाटा ह्या यमदूती कशा आहेत हे कळून आपल्या ज्ञानात भर पडते.
वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुस्तकातील चित्रांमुळे खूप चांगल्या प्रकारे सर्व समजून येते. उदा. आवाज न करता पर्वतासारखी येणारी लाट. उथळ व खोल सागरात पाण्यातील तरंगामधले जल कणांचे मार्ग, तरंगांचे प्रकार, त्यांची पातळी, दिशा, लांबी, उंची, समुद्र कितनाऱ्यावर फुटणारी लाट, विशेष म्हणजे भूकंप कसा घडतो? भूकंपातील हालचाली, सूनामी लाटांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा वगैरे 10, 11 चित्रे आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी वर्गासाठी तर उत्तमच पण इतर उत्सुक वाचकांसाठीही उत्तम आहे.
यमदूती सुनामी विभावरी शेंबेकर
लेखक : श्री. गो.बा. सरदेसाई 9405142209
पृष्ठे: 64 किंमत : 65 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
Email : nachiketprakashan@gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
संग्रही असावे असे “जागतिक रसायनशास्त्रज्ञ” !
2011 हे वर्ष जगात आंतरराष्ट्रीय रसायन शास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यासाठी “रसायनशास्त्र : आमचे जीवन, आमचे भविष्य” या बोधवाक्याची निवड करण्यात आली आहे. अशा या जागतिक रसायनशास्त्र वर्षात जागतिक रसायनशास्त्रज्ञ हे उत्तम पुस्तक प्रसिद्ध करून नचिकेत प्रकाशनाने औचित्य साधले आहे. 100 वर्षांपूर्वी पोलंडमधील महिला शास्त्रज्ञ मारी क्युरीने रसायनशास्त्रात नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्य शोधून त्याला आपल्या मायभूमीच्या सन्मानार्थ पोलोनियम हे नाव दिले. हा शोध लावल्याबद्दल मारी क्युरीला 1911 साली रसायनशास्त्रात दुसरे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. तिला पहिले नोबेल पारितोषिक 1903 साली भौतिक शास्त्रात लावलेल्या किरणोत्सर्गी तत्त्वांसाठी तिचे पती पियुरे क्युरी आणि गुरू हेन्री बेकरेल यांच्यासोबत बहाल करण्यात आले. ज्ञात जगात अशाप्रकारे रसायनशास्त्र क्षेत्रात मानवजातीला लाभदायी ठरणारे शोध लावणाऱ्यांचा, त्यांच्या शोधासह सचित्र परिचय घडवून देणारे एक अत्यंत उपयुक्त व माहितीपर पुस्तक प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी लिहिले असून ते नागपूर येथील सुप्रसिद्ध नचिकेत प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. नचिकेत प्रकाशन अशी विविध माहितीपर दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. रसायनशास्त्राचा उपयोग आपली पृथ्वी व ब्रम्हांड यातील गुपिते शोधून काढण्यासाठी होत आहे. मानवाच्या जीवनात प्राणवायू, पाणी आणि अन्नाला अत्यंत महत्त्व असून हे तीनही घटक रसायनशास्त्राचे अविभाज्य घटक आहेत. या शास्त्राने खरे तर मनुष्याला काय नाही दिले? हाच प्रश्न विचारणे योग्य ठरेल. आज आपण जे उच्चभ्रू जीवन जगत आहोत त्यासाठी शास्त्रज्ञांनी घेतलेल्या संशोधनाला महत्व आहे. मानवाच्या गरजा या आधीही भागत होत्या. त्यातही रसायनशास्त्राचाच वाटा होता परंतु लोक त्या शास्त्राकडे फार आदराने बघत नव्हते. 18 व्या शतकापासून रसायनशास्त्राला लोकमान्यता मिळाली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या शास्त्राकडे लोक बघू लागले. रसायनशास्त्रात अनेकानेक शास्त्रज्ञांनी शोध लावून मानवजातीच्या कल्याणात भर घातली आहे, घालत आहे व पुढेही घालणार आहेत. ही न संपणारी साखळी आहे. या साखळीत अनेक शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध जोडता येतील. यातील काही प्रख्यात शास्त्रज्ञांची ओळख प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी आपल्या जागतिक रसायनशास्त्रज्ञ या पुस्तकात करून दिली आहे. यात त्यांनी 43 पुरुष आणि 10 महिला शास्त्रज्ञांची ओळख त्यांनी केलेल्या संशोधनासह दिली आहे. पुस्तक वाचताना या रसायन शास्त्रज्ञांनी आपापले संशोधन करत असताना किती हालअपेष्टा सहन केल्या, किती त्याग याची माहिती मिळते. काही शास्त्रज्ञ असे आहेत की त्यांनी आपला जीवही धोक्यात घातला आहे. शोध घेताना त्यांची समर्पण वृत्ती त्यांच्या संशोधनातून दिसून येते. शेवटी मानवी जीवन सुखकर होवो यासाठीच या शास्त्रज्ञांनी खस्ता खाल्ल्या, कष्ट सहन केले. स्वत:जवळचा पैसा खर्च करून समाजाला सुखी करण्यासाठी अपार परिश्रम घेतले. अशा या शास्त्रज्ञांची ओळख आपण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मग रसायनशास्त्र हा आपला अभ्यासाचा भाग नसला तरी हे पुस्तक माहितीच्या दृष्टीने खरोखर उपयुक्त ठरते. केवळ इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर फावल्या वेळात इतर वाचन करणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अत्यंत माहितीपर आहे. पुस्तकात शास्त्रज्ञाचे छायाचित्र टाकले आहे ते मध्यभागी न घेता बाजूस घेतले असते तर अधिक चांगले झाले असते. अक्षराच्या टाईपही थोडा लहान वाटतो. या एक दोन गोष्टी सोडल्या तर पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे आहे. संपूर्ण निर्मिती नचिकेतच्या परंपरेप्रमाणे उत्कृष्ट व दर्जेदार असून मुखपृष्ठही अत्यंत आकर्षक आहे. अशा या पुस्तकांसाठी लेखक, प्रकाशक दोघांचेही अभिनंदन!
जागतिक रसायनशास्त्रज्ञ विलास कुळकर्णी
लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे
पृष्ठे: 176, किमत : 180 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
Email : nachiketprakashan.gmail.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
रामजन्मभूमीचे अभूतपूर्व आंदोलन
पुस्तकाला ग्रंथालय भारतीतर्फे प्रथम पुरस्कार
नचिकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि श्री. दि. भा उर्फ मामासाहेब घुमरे लिखित “रामजन्म भूमीचे अभूतपूर्व आंदोलन” या पुस्तकाला ग्रंथालय भारतीतर्फे प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री. काशीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार असून पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथे एका जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
बॅंकिंग प्रश्नोत्तरे
बॅंकिंग प्रश्नोत्तरे हे बॅंकिंग सर्व पैलूवरील प्रश्नांचे उत्तरे देणारे सुमारे एक हजाराहून अधिक प्रश्न-उत्तरे असणारे अभिनव पुस्तक आम्ही नचिकेत प्रकाशन प्रकाशित करीत आहोत.
जी प्रश्ने यात असावीत, असे आपल्याला वाटते ती फक्त प्रश्ने आपण आम्हाला कळवावी. ती आधी विचारात घेतली नसल्यास यात समाविष्ट केली जाईल आणि पुस्तकात आपला ऋण निर्देशही केला जाईल. तसेच या पुस्तकांसाठी चांगले समर्पक नावही आपण सूचवू शकता. ज्यांचे नाव निवडले जाईल त्याला हे पुस्तक ऋण निर्देशासह सप्रेम भेट दिले जाईल.
आपले प्रश्न आम्हाला 20 ऑगस्टपर्यंत मिळावीत, ही अपेक्षा.
आपले प्रश्न nachiketprakashan@gmail.com वर कृपया पाठवावे.
धन्यवाद
स्नेहांकित
अनिल सांबरे
नचिकेत प्रकाशन
Posted in Uncategorized | Leave a Comment »
नचिकेत प्रकाशने आता इंटरनेटवर अनेक साईटवर उपलब्ध
नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर सर्व प्रमुख गावी सर्व प्रमुख ग्रंथविक्रेते, ग्रंथ प्रदर्शन करणारे यांच्या कडे उपलब्ध होतीच. आता यापुढे ती इंटरनेटवर उपलब्ध झाल्यामुळे महाराष्ट्राबाहेर तसेच देशाबाहेर राहणारा वाचक वर्ग तसेच इंटरनेटवर खरेदी करणारा नवा वर्ग यांच्यासाठीही नचिकेत प्रकाशनांची पुस्तके खरेदी करणे सहज व सोपे झाले आहे.
नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके आता इंटरनेटवर विविध वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करून नचिकेत प्रकाशनने मोठा टप्पा गाठला आहे. मायबोली, बुक गंगा, माय हॅंग आऊट स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इन्फिबीम या साईटवर नचिकेत प्रकाशनाचे सर्व पुस्तके, यांचे परिचय व अन्य माहितीसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासाठी तसे विशेष विक्री करार या साईटच्या व्यवस्थापनाशी नचिकेत ने केले आहेत. नजिकच्या काळात आणखी काही साईटवर नचिकेतची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होतील, असेही श्री. अनिल सांबरे यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे.
नचिकेत प्रकाशनाच्या ब्लॉगवर वाचक रोज मोठ्या संख्येने भेट देत असतात. या ब्लॉग वर नचिकेत प्रकाशन संबंधित सर्व माहिती, नवी पुस्तके, पुस्तक परिचय, विविध योजना, वाचकांच्या प्रतिक्रिया आदी माहिती असते. त्यामुळे वाचनालये, शाळा, कॉलेज, यांचे ग्रंथपाल/प्राचार्य यांनी nachiketprakashan.wordpress.com ला खरेदीपूर्वी भेट द्यावी, असे आवाहन नचिकेत ने केले आहे.
या संदर्भात कोणत्याही खुलासा चे माहितीसाठी nachiketprakashan@gmail.com वर किंवा 9225210130 वर संपर्क साधावा, असे आवाहन नचिकेत प्रकाशनाने केले आहे.
नचिकेत प्रकाशने आता ई-बुक स्वरूपातही उपलब्ध
नचिकेत प्रकाशनाची काही निवडक पुस्तके आता ई-बुक स्वरूपात तयार होत असून 15 ऑगस्ट पासून ती लोकांना लेेज्ञसरपसर.लेा वर विकत घेता येतील, असे नचिकेत प्रकाशनाचे संचालक श्री. अनिल सांबरे यांनी म्हटले आहे. नचिकेत प्रकाशन आणि बुक गंगा यांनी संयुक्तरीत्या हा e – books वर प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे.
e – बुक ची किंमत प्रत्यक्ष पुस्तकापेक्षा 10%ने कमी राहणार आहे. ही पुस्तके तुम्हाला विकत घेतल्यावर एकतर तुमच्या कम्प्युटरवर डाऊनलोड करता येईल किंवा आयपॉडवर डाऊनलोड करता येईल. मात्र याची इतरत्र कॉपी करता येणार नाही. किंवा यांचा प्रिंट आऊटही काढता येणार नाही.
नवीन पिढीच्या वाचकवर्ग तसेच देशाबाहेरही अमेरिका युरोप येथे मराठी वाचक वर्गाला बुक रीडर वरच पुस्तके वाचण्याची सवय लागली आहे त्यांची ही गरज आता नचिकेत प्रकाशनांच्या इ-बुक्स ने पूर्ण होऊ शकेल. यात सर्व व्यवहार ऑन लाईनच होणार आहेत.
यापुढे काही पुस्तके फक्त ई-बुक स्वरूपातच काढण्याचीही नचिकेत प्रकाशनाची योजना असून त्यानुसार आखणी सुरू आहे, असे पत्रकात कळवले आहे.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
You Can Purchase
Our all books at
-
www.mayboli.com
-
www.bookganga.com
-
www.flipkart.com
-
my hangoutstore.com
-
Our selected books are now available in e-book form
-
You can purchases our e-books at www.bookganga.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
For Regular Updates about new publications, functions, Scheme of Nachiket Prakashan just give your Mobile No & E-mail.
Thanks
Name :
Place :
Mobile No. :
E-mail :
Posted in Uncategorized | Leave a Comment »
We will be thankful to you, if you can suggest & help us.
Please Suggest.
-
Author (For Writing Book)
-
Book Subject (For Book)
-
Book Sellers (For Selling)
-
Library (For Purchase)
-
School (For Purchase)
-
Colleges (For Purchase)
-
Representative (For Business Association)
(By Mobile or E-mail)
Thanks
Posted in Uncategorized | Leave a Comment »
V. K. Book Agency, Mumbai is most effective Book Seller for Nachiket Prakashans sales for the month of July 2011. Congratulations.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
Best Saler books of Nachiket Prakashan for July are
-
Banking Dhorne
-
Yashashvi Dukandari
-
Vanaspatiche Adbhut Vishwa
-
Jagtik Tapman Vadh
-
Adhunik Bhartiya Ganiti
Posted in Uncategorized | Leave a Comment »
Posted in Customers, Pramotion, readers | Tagged customer, nachiket books, readers, response | Leave a Comment »
सर्वाना श्री गणेश उत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !यंदा गणरायाच्या दहा दिवसात किमान एक तरी मराठी पुस्तक खरेदी करू आणि दोन पुस्तके वाचू अशा रीतीने या विद्येच्या देवतेला वंदन करूँ तिची पूजा करू या
Posted in Uncategorized | Leave a Comment »
सहकार समृद्धीचा दीपावली विशेषांक मोठ्या आकाराच्या स्वरूपात यंदा दिवाळीला प्रसिद्ध
होत आहे.
नागरी बॅंका, पतसंस्था आणि सहकार क्षेत्र यांच्या संदर्भात प्रचंड बदल घडत आहेत. दामोदर कमिटीच्या अहवालामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्या सर्वांचा उहापोह या अंकातून होईल.
मुद्रित स्वरूपात आणि इ-बुक (e-Book) स्वरूपातही अंक उपलब्ध राहणार आहे. दीपावली अंक मुद्रित स्वरूपात आणि बाकी दरमहाचे अंक इ-बुक स्वरूपात या पुढे नियमित प्रकाशित होणार आहे. तसेच sahakar samrudhi, urban bank india, आणि patsanstha vishva या तीनही ब्लॉगवर पूर्ण अंक आणि तसेच त्या त्या क्षेत्राची माहिती त्या त्या ब्लॉग वर अपडेट होत जाईल.
नागरी बॅंका, पतसंस्था यांच्याशी संबंधित सर्व पदाधिकारी, संचालक, वरिष्ठ व्यवस्थापक सध्या कर्मचारी, सी.ए.ऑडिट अशा सर्वांकडून आलेल्या साहित्याचे स्वागत आहे. नागरी बॅंका/ पतसंस्थांना/आकडेवारी/माहिती अवश्य पाठवावी. तीही अंकात प्रसिद्ध केली जाईल
आपली माहिती/लेख शक्य तो इमेलने पाठवावा. 25 सप्टेम्बर पर्यंत साहित्य मिळावे, ही अपेक्षा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
धन्यवाद
Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया »
श्री गणेश चतुर्थीला गणरायाच्या आगमना निमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा !
सर्व क्षेत्रातील नेत्यांना, अधिकाऱ्यांना आणि विद्वानांना सदबुद्धी देवो !
हा सुखकर्ता सर्व सजन्नांच्या मार्गातील दु:खाचे , कष्टाचे, विघ्नांचे विघ्नहरण करो !
Posted in Uncategorized | Leave a Comment »
सहकार-उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठी
समृध्दीचा दीपावली विशेषांक प्रसिद्ध होणार
अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वदूर विश्र्वासप्राप्त समृद्धी मासिकाचा दीपावली अंक प्रसिद्ध होत असून त्यासाठी लिखाण पाठविण्याचे आवाहन संपादक व प्रकाशक श्री. अनिल सांबरे यांनी केले आहे. समृद्धी मासिक नचिकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असते.
या वेळच्या अंकात सहकारासोबत उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्र, व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास या संबंधीचे लिखाणही आवर्जून प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, कर व विधी सल्लागार यांनी आपले अनुभवी लिखाण शक्यतो इमेलने पाठवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
समृध्दी मासिकाचा दीपावली विशेषांक येत्या दीपावलीला प्रसिध्द होत आहे. हा विशेषांक स्वच्छ व पारदर्शी प्रशासन विशेषांक म्हणून प्रसिद्ध होणार आहे. सर्वांचे अनुभव त्याच सोबत तज्ञ मंडळींचे विशेष लेख यांनी हा अंक समृध्द राहणार आहे. एकूणच सहकारी क्षेत्राला उज्ज्वल भवितव्यासाठी स्वच्छ पारदर्शी, लोक केंद्री प्रशासनाशिवाय गत्यंतर नाही. कर्मचारी, अधिकारी, संचालक यांची कार्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि लोकांप्रति तसेच आपल्या कामाप्रती/जबाबदारीप्रति उत्तरदायित्व हे सिद्ध करण्याचा हा काळ आहे. या विषयाकडे आम्ही कसे पाहतो? ते सुधारावे यासाठी काय व किती प्रयत्न करतो? या दृष्टीने केलेले प्रयोग, सर्वेक्षण व मूल्यांकन आपण इतरांना मोकळेपणे सांगावे, अशी अपेक्षा आहे याचा ताळेबंद मांडावा व या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या विशेषांकाची योजना केली आहे.
या विशेषांकात संस्थेच्या प्रशासनाकडून वरील बाबी लक्ष करण्यासाठी काय योजना आखल्या? त्यात कसे यश मिळाले? त्यातून संस्थेची प्रगती कशी झाली, याबद्दल अनुभव अवश्य लिहून पाठवावे, आपले लिखाण शक्यतो इमेलने पाठवावे, त्यास समृध्दीच्या या विशेषांकात आपल्या छायाचित्रासह प्रसिध्दी दिली जाईल. लिखाण 30 सप्टे. पर्यंत मिळावे,
सर्वांच्या प्रेम-सहकार्यामुळे समृध्दी मासिकाने अंकांचे अर्धशतक मागेच गाठले. सहकार चळवळीतील नागरी बॅंका व पतसंस्था क्षेत्रातील निष्पक्ष, राजकारण विरहित, निखळ विधायक व प्रचंड माहिती मूल्य असणारे, सर्वांच्या विश्र्वासाला पात्र ठरलेले संग्राह्य नियतकालिक म्हणून समृध्दीने सर्वांच्या मनात स्थान मिळविले आहे.
हा विशेषांक मुद्रित स्वरूपात तर राहणार आहेच परंतु तो इ-आवृत्ती स्वरूपातही प्रसिद्ध होणार आहे आणि त्या स्वरूपात इंटरनेट वर सर्वांना उपलब्ध राहणार आहे. दीपावली नंतरचे सर्व मासिक अंक इ-आवृत्ती स्वरूपात उपलब्ध राहतील, तसेच सर्वांना इमेलने पाठवले जातील.
अंक साहित्य पाठविण्याचा पत्ता :
संपादक, समृद्धी
नचिकेत प्रकाशन
24, योगक्षेम ले-आऊ ट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर-440 015 महाराष्ट्र
टेलिफॅक्स : 0712 -2285473
भ्र.9225210130, 8149930004, 7385626907
E-mail : nachiketprakashan@gmail.com
Site : nachiketprakashan.wordpress.com
Posted in Uncategorized | Leave a Comment »
: जाहिरात दर :
-
बहुरंगी मुखपृष्ठ 4 – 7500 रू.
-
बहुरंगी मुखपृष्ठ 3/2 – 5500 रू.
-
पूर्ण पान – 3500 रू.
-
अर्धपान – 2000 रू.
मुद्रित पेज : 6″× 9″
आर्टवर्क : जाहिरातीच्या आर्टवर्कची इमेज फाईल कृपया पाठवावी.
सूचना : जाहिरातीचा चेक नचिकेत प्रकाशन नावे कृपया पाठवा.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
नचिकेत प्रकाशन
1. इंटरनेटवर :
-
नचिकेत प्रकाशनाच्या ब्लॉगवर सर्व माहिती दैनंदिन अद्ययावत केलेली असते. ग्राहकांना माहिती देण्यासाठी केव्हाही त्याचा आधार आपण घेऊ शकता. नचिकेत प्रकाशनाच्या ब्लॉगला रोज शंभर तरी माणसे भेट देत असतात.
-
गुगलवर सर्च केल्यास आपणास नचिकेत प्रकाशनाच्या इंटरनेटवरील अस्तित्वाची सर्व माहिती मिळू शकेल.
-
फेसबुक, ट्वीटर वर नचिकेत प्रकाशन आहे. आपण याचा वापर करीत असल्यास सर्व बाबी आपणास लगेच समजत जातील.
-
आपण फेसबुक वर कनेक्ट राहू शकतो.
-
शीघ्र संपर्कासाठी व आपणास इ-वार्तापत्र पाठविण्यासाठी कृपया आपला इ-मेल कळवावा.
-
इ-बुक : नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके आता इ-बुक स्वरूपात तयार होऊन उपलब्ध होत असून ती bookganga.com वर विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
-
ऑनलाईन विक्री : नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके आता 5-6 साईटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असून ती देशाबाहेरही खरेदी केली जात आहेत.
2. योजना :
-
पुस्तक भेट योजना, आगामी पुस्तक नोंदणी योजना आणि संस्थागत पुस्तक खरेदी योजना अशा तीन योजना जाहीर करण्यात आल्या असून त्याची माहितीपत्रके आपल्याकडे या आधीच पाठविण्यात आली आहेत.
-
महिन्याचा प्रभावी विक्रेता ही योजना सुरू केली असून जुलैचा प्रभावी विक्रेता म्हणून व्ही.के. बुक एजन्सीज, मुंबई यांची निवड झाली आहे. त्या त्या महिन्यातील सर्वाधिक विक्री व वसुली आधारे ही निवड होत असते.आगामी काळात आपली निवड व्हावी, यासाठी शुभेच्छा!
-
बेस्ट सेलर पुस्तके : द बॅंकिंग धोरणे द यशस्वी दुकानदारी द वनस्पतींची अद्भुत कार्यशैली द जागतिक तापमान वाढ द आधुनिक भारतीय गणिती ही पाच पुस्तके जुलै महिन्यात सर्वाधिक खपाची-बेस्ट सेलर ठरली आहेत.
-
भाग्यशाली ग्राहक योजना ही सर्व ग्राहकांसाठी आहे. जुलैचा भाग्यशाली ग्राहक म्हणून जळगावचे श्री. संतोष नवगळे यांची निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन पत्र व भेट पाठविण्यात आली आहे. भाग्यशाली ग्राहक योजनेत अधिकाअधिक ग्राहकांचा सहभाग वाढावा यासाठी आपणही पुढाकार घ्यावा व आपल्या ग्राहकांना या योजनेबद्दल सांगून प्रेरित करावे, असे वाटते.
-
पुरस्कार : आपल्या रामजन्मभूमी पुस्तकाचे लेखक श्री. दि. भा. घुमरे यांना ग्रंथालय भारतीचा प्रथम पुरस्कार नुकताच नागपुरात एका जाहीर कार्यक्रम देण्यात आला.
-
प्रकाशन : नचिकेत प्रकाशनांची 17 पुस्तके मागील 3 महिन्यात प्रसिद्ध झाली असून ती आपल्याकडे आली असतीलच. त्यांची वाढीव मागणी कृपया कळवावी.
-
प्रकाशन समारंभ : आधुनिक भारतीय गणिती – श्री. स.पां. देशपांडे आणि पर्जन्यशास्त्र डॉ. उमा पालकर या दोन पुस्तकांचा संयुक्त प्रकाशन समारंभ मुंबई मध्ये माटुंगा येथील रुईया कॉलेजच्या सभागृहात साजरा झाला. प्रसिद्ध विज्ञान लेखक प्रा. मोहन आपटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मराठी विज्ञान परिषदेचे सचिव श्री. अ.पां. देशपांडे व डॉ. शरद साने प्रमुख अतिथी होते.
-
नवीन आवृत्ती : श्री गुरूचरित्र जसे आहे तसे आणि ऑडिट मार्गदर्शक या दोन लोकप्रिय पुस्तकांची आवृत्ती संपली असून लवकरच दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. आपण या करिता ग्राहकांची मागणी कृपया नोंदवून घ्यावी.
-
आगामी पुस्तके : या महिन्यात खालील पुस्तके प्रकाशित होत आहेत.
-
मातंग समाज प्रगतीच्या दिशेने
-
नक्षलवादाचा सामना
-
मुस्लिम दहशतवाद
-
स्वास्थ्य सूक्ते
-
इस्त्रायली तंत्रज्ञाने
-
बॅंकिंग प्रश्नोत्तरे
-
प्रसिद्धी : दैनिके/साप्ता./मासिके यात नचिकेत प्रकाशन निरनिराळ्या पुस्तकांचे परिचय वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचा ही उपयोग आपणास विक्रीवाढीसाठी होत असेल. आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील रहावे.
-
कृपया आपली नवीन पुस्तकांची तसेच जुन्या पुस्तकांची मागणी लगेच कळवित जावी. तसेच नचिकेतची सर्व पुस्तके आपल्याकडे कायम उपलब्ध असावी असे वाटते. इमेल/S.M.S. ने मागणी कळवणे उत्तम.
-
व्यवसाय वाढीसाठी आपल्या बहुमोल सूचनांचे स्वागत आहे.
-
कोणत्याही निमित्ताने नागपूरला येणे झाल्यास आपल्या कार्यालयास अवश्य भेट द्यावी, आपले सहर्ष स्वागत आहे.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
Posted in Uncategorized | Leave a Comment »
ISBN Title
978-93-80232-41-6 Shodh Mangalacha
978-93-80232-45-4 Vinashachya Vatevaril Prani
978-93-80232-44-7 Sajivanche Jivankalah
978-93-80232-43-0 Jagtik Tapman Vadh
978-93-80232-42-3 Yamduti Sunami
978-93-80232-46-1 Adhunik Bhartiya Ganiti
978-93-80232-49-2 Jagtik Rasayan Shatradnya
978-93-80232-48-5 Parjanyachakra
978-93-80232-32-4 Mahanayak Shivaji
978-93-80232-39-3 Tukaram Maharajanche Jeevansutre
978-93-80232-36-2 Mrutunjay Markandeya
978-93-80232-36-2 Bhavna Rushi
978-93-80232-32-4 Maharshi Bhrugu
978-93-80232-37-9 Nisargatil Vidnyan
978-93-80232-22-5 Devswarupa Kamdhenu
978-93-80232-29-4 Yashashvi Dukandari
978-93-80232-25-6 Pradushanatun Paryavarnakade
978-93-80232-05-8 Kitkanchi Navlai
Angalakshan Sanket
978-93-80232-19-5 Chanakya Sutre
978-93-80232-10-2 Maharshi Abhiyanta : Visheshwariyya
978-93-80232-15-7 Yantramagil Vidnyan
978-93-80232-16-4 Dr. Homi Bhaba
Grahak Chetana
Kisan Niyojak
Marathi Granthasampada 08
Sarvajanik G. Margadarshak
Shakun Sanket
Swapna Sanket
Vaidarbhiya Granthasampada 06
978-93-80232-02-7 1971Chi Romanchak Yudhagatha
Janewari 30 Nantar
Sagesoyre
978-93-80232-38-6 Samarth Sutre
978-93-80232-34-8 Mahabhartatil Vidurniti
978-93-80232-33-1 Shukraniti
978-93-80232-08-9 Yashashvi Netrutvasathi Prabhavi Vyaktimatva
Shree Gurucharitra Jase Aahe Tase
978-81-907138-6-3 Shree Gurugranth Saheb Parichay
978-81-907138-5-6 Aapli Suryamala
978-93-80232-26-3 Bhartiya Ganiti
978-93-80232-04-1 Bhartiya Vaidnyanik
978-93-80232-03-4 Dhanyachi Kulkatha
978-93-80232-28-7 Gauravshali Bhartiya Kalganana
978-93-80232-12-6 Athang Antaralacha Vedh
978-93-80232-05-8 Kitkanchi Navlai
978-81-907138-3-2 Nisargachi Navlai
978-93-80232-06-5 Prayogatun Vidnyanakade
978-93-80232-09-6 Nakshatra Maitri
Onjalitil Moti
978-93-80232-11-9 Aapatti Vyavasthapan
978-93-80232-17-1 Mahila Vaidnyanik
978-93-80232-18-8 Jagatik Khagolshatradnya
978-93-80232-13-3 Bhartiya Shilpashastre
978-93-80232-22-5 Devswarupa Kamdhenu
978-93-80232-20-1 Gosukte
978-93-80232-21-8 Panchgavya Aushodhopachar
978-93-80232-23-2 Vanaspatinchi Adbhut Karyashaili
978-93-80232-14-0 Adbhut Pakshi Vishwa
978-93-80232-24-9 Ramjanmabhoomi Muktiche Andolan
978-93-80232-40-9 Vyakta Mi Avyakta Mi
978-93-80232-49-2 Yogini
Banking Niwade Digest
978-93-80232-01-0 C.E.O. Bhumika & Jababdari
978-93-80232-00-3 Karmachari Vyavasthapan
Nivdak Banking Nivade
978-81-907138-7-0 Patsanstha Formats
978-81-907138-0-1 Patsanstha Vyavasthapan
Sahakar Paripatrake (Bank)
Sahakar Paripatrake (Patsanstha)
978-81-907138-1-8 Shakha Vyavasthapan
Patsanstha Margadarshak 11
Nagari Bank Sandharbha 11
Karja Vasuli Margadarshak 11
Sanchalak Margadarshak 11
Sewak Seva Pustika
978-93-80232-30-0 Kimmat Vishleshan
978-93-80232-31-7 Banking Paribhasha Kosh
978-93-80232-47-8 Banking Dhorne
Posted in Uncategorized | Leave a Comment »
प्रभावी विक्रेता
नचिकेत प्रकाशनातर्फे ऑगस्ट महिन्याचा प्रभावी विक्रेता म्हणून अक्षर साहित्य, चिपळूणचे श्री. मिलिंद पिपळूटकर यांची निवड झाली आहे. याकरिता आपले मन:पूर्वक अभिनंदन! त्यांचे छायाचित्र खालील प्रमाणे आहे.
Posted in Uncategorized | Leave a Comment »
नचिकेत प्रकाशनाची आगामी पुस्तकांसाठी सवलत योजना
-
सर्व आगामी पुस्तके दर्शनी किंमतीच्या 25% सवलतीत मिळतील.
-
योजनेत सहभागी होताना किमान 1500 रू. जमा करायचे आहेत.
-
ही योजना वर्षभरासाठी लागू राहील व पैसे मिळाल्यापासून वर्ष सुरू होईल.
-
प्रसिद्ध झाल्यावर पुस्तक लगेच अग्रक्रमाने पुस्तके घरपोच पाठविली जातील.
-
पुस्तक पाठविण्याचा खर्च 30/- रू. प्रति पुस्तक येईल.
-
वर्षभरात किमान 1500 रू. ची पुस्तके घेणे आवश्यक आहे.
-
नवीन पुस्तकांची माहिती इमेल/एसएमएस ने वेळोवेळी कळवली जाईल.
-
प्रकाशनाच्या ब्लॉगवरही आपणास नवीन पुस्तकाचे परिचय पाहता येईल.
-
योजनेत सहभागी होताना आपला संपूर्ण पत्ता, फोन, भ्रमणध्वनी, इमेल कळवावा. तसेच आपल्या आवडीचे विषय आणि दरमहा पुस्तक खरेदीच्या रकमेची मर्यादाही कृपया कळवावी.
-
आपल्या तर्फे आपल्या ऐवजी आप्तमित्रांनाही ही पुस्तके आपण भेट म्हणून आमच्यातर्फे पाठवू शकता.
-
साधारणपणे नचिकेत प्रकाशनातर्फे दरमहा 4 पुस्तके प्रसिद्ध होतील. सवलत योजना नि:शुल्क आहे.
Posted in Uncategorized | Leave a Comment »







































